पुढील संवाद काळजीपूर्वक वाचा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय निवडा. “सायब, मी दामू हाय. मला काहीतरी कामधंदा हवाय." “तू कोणते काम करु शकतोस?" “अहो ऐकलंत का? त्याला स्वयंपाक करता येतो का, हे पहिले विचारा." “हो विचारतो गं. काय रे, तुला स्वयंपाक करता येतो का?” “होय सायब, मी सगळी कामं करेन." “घरी कोण कोण आहे तुझ्या?” “मालकीणबाई सगळी हायेत. चार गुरे, दोन आंब्याची झाडं, बायको, पोरं आणि आईवडील सुद्धा." "मग तू इकडे कसा काय आला आहेस?" “कामधंद्यासाठी. पावसाच्या जोरदार माऱ्यानं सगळं नाहीसं झालं. खूप कष्ट केलं व्हतं." “हो, वाचले आहे आम्ही वर्तमानपत्रात. यावर्षीच्या पावसाने शेतीवाडीचे तुमचे खूप नुकसान झाले आहे." “होय मायबाप, सरकार कधी ओला दुष्काळ जाहीर करतंय कुणास ठाऊक." “आई, मी निघाले गं कॉलेजला. संध्याकाळी घरी यायला उशीर होईल." “आदिती, सावकाश जा. उशीर होणारच आहे तर तुझी गाडी घेऊन जा."
दामू कामधंदा शोधण्यासाठी शहराकडे आला कारण ...
Options
आई-बाबांना देवदर्शनासाठी पाठवण्यास पैशाची गरज होती.
मुलीच्या कॉलेजची फी भरावयाची होती.
अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने पैशांची गरज भासू लागली होती.
शहराकडे येण्याची त्याला ओढ होती.